Skip to main content

जाणीव

 जाणीव

- डॉ. मुकुल स. गोडबोले (c)


मनुष्य प्राण्याला सतत जाणीव करून द्यावी लागते. उदारहण, वेळेचं भान ठेवण्यासाठी मनगटी घड्याळ बांधावं लागतं. स्पष्ट दिसावं यासाठी डोळ्याला चष्मा लावावा लागतो. अनादी काळापासून (11 व्या शतकापासून) माणूस (मुख्यतः पुरुष) जानवं घालत आला आहे. जानवं हे एक प्रकारे वस्त्रच मानलं गेलं आहे. मध्यंतरी जानवं केवळ ब्राह्मण घालू लागले, इतर वर्णांनी त्याचा वापर कमी केला. पण मुळातच, जानवं घालावं तरी कशाला? ते लहान वयातच का घालायला सुरुवात करायची? आणि ते खांद्यावरून कमरेकडे वं परत खांद्याकडे का घालावे? नुसतं मनगटी, किंवा गळ्याभोवती, किंवा कमरेभोवती का गुंडाळू नये? हे प्रश्न मनात सतत येत असत. त्याची म्हणावी तशी उत्तरं कधी मिळाली नाही. पण एके दिवशी 'जाणीव' झाली! माझ्या मते जानवं हे माणसाला जाणीव करून देण्यासाठी एका विशिष्ठ प्रकारेच परिधान करणे आवश्यक आहे. आणि जानवं व जात/पंथ/लिंग/वर्ण यांचा काहीच संबंध नाही. कारण जाणीव हि प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेची असते! मनुष्य शरीर हे पृथ्वीवरील पंच महाभुतांपासून बनलं आहे, व जे ब्रह्मांडात आहे ते शरीरात आहे असे मानले जाते. मनुष्य प्राण्याचं अस्तित्व हे पृथ्वीच्या अस्तित्वाशी जोडलेलं आहे. त्यामुळे मनुष्य शरीर हे एका लोहचुंबक आहे. ज्याला उत्तर (मेंदू) व दक्षिण (पाय) बाजू आहेत. म्हणून दक्षिणेकडे पाय करून झोपू नये असे लहानपणापासून सांगितले जाते. पृथ्वी हि २३.४ अक्षांश झुकलेली आहे; ज्यामुळे जीव-सृष्टी जन्मू व तग धरू शकली आहे. इतर ग्रहांप्रमाणे जरा जरी हा कोन बदल केला, तर जीव-सृष्टी संपेल. आता याचा जानव्याशी काय संबंध? खूप जवळचा संबंध आहे! जानवं हे खांद्यावरून परिधान केल्यास मुख्य शरीरापासून (मध्य रेषा) २३.४ इतका कोन तयार होतो, जो पृथ्वीच्या अक्षांशाशी मेळ खातो. शरीराच्या उत्तर व दक्षिण ध्रुवाला छेद देत जानवं परत कमरेकडून खांद्यावर येतं. एक पूर्ण चक्र! जणू पृथ्वी भोवती एक प्रदक्षिणा. आपलं शरीर हे पृथ्वी सम आहे याची जाणीव करून देण्याचं काम जानवं करतं! ३६५ दिवसात किमान एकदातरी जानवं बदलावं, जसं ऋतु पालट होतो, तसं! लहानवयात मुंज/उपनयन संस्कार करून शरीराची/पृथ्वीची सूर्याशी बांधिलकी जोडली जाते. नाहीतर जानवं हे सूर्याला अर्पण करूनच परिधान करायची पद्धत उगाच का पडली असेल? त्याला हेच एक कारण मला तरी योग्य वाटते. तर अशाप्रकारे जानवं हे प्रत्येक स्त्री-पुरुषाने परिधान करून स्वतःची पृथ्वी व सूर्याशी नाळ जोडून घ्यावी. जेणेकरून ब्रह्मांडाशी एकरूप होता येईल.

Comments

Popular posts from this blog

तुझा, मुकुल

  तुझा , मुकुल - डॉ. मुकुल स. गोडबोले   वाळलेला दाणा , मज पेरले तुझ्या कुशी लाभले पाणी , रवी , हवा , तुझी छाया नि माया , धरती माता काळ जरा उलटला , नि कोंब मज फुटला जन्मलो नि वाढलो , तू माझी आभाळमाया आईच्या कुशीत खेळण्यात मग कसला आलाय झगडा ? तुझ्या गर्भातून डोकावता नमन तुज करितो माता वाढ होण्यास माझी मुळं रोवली तुझ्यात कधीही नं कुरकुरता , ती तू सामावली स्वतःत सामर्थ्य माझे मज , अवगत तू केले गर्भसंस्कार उत्तम झाले , तुझ्या हातभारे , मला गोंडस रूप आले मुकुल ते वृक्ष वाढलो तुझ्यामुळे पानं , फुलं , बिया वाहतो तुज हर ऋतूत , त्याचेही तू करसी चीज , जन्म देऊनी नवीन मुकुल आपुले नाते इतके घट्ट धरून ठेविसी एकसंघ उन्मळून जरी पडलो परी तुझ्यात परत सामावलो सांभाळ ग आई मज मी बाळ तुझ्या   कुशीत   आलो  

"हाडांच्या आरोग्याचे मूल्यमापन" - एक समालोचन !

 "हाडांच्या आरोग्याचे मूल्यमापन" - एक समालोचन ! हाडांचे आजार व दुखणी फक्त वयाशी जोडली जातात. पण असे विकार हे जनुकीय, अपघात, अयोग्य वापर, दुर्लक्ष करणे, आदी कारणांमुळे देखील उद्भवतात. हाडांचे आजार वेळीच ओळखले गेले तर त्यावर उपचार घेऊन ते बरे देखील होऊ शकतात. काही विशिष्ट उपकरणं वापरून हाडांचे विकार किंवा तसे घडण्याची शरीराची प्रवृत्ती ओळखता येते. अशी उपकरणं रुग्णालयं व आरोग्य केंद्रांमध्ये जरी उपलब्ध असली, तरी त्यांच्या मदतीने चिकित्सा करून घेणे हे सर्वसामान्यांसाठी शक्य होत नाही. आधुनिक काळात नवनवीन उपकरणं येत राहिली. पण तरी, अचूक व किफायतीशीर निदान करणारी उपकरणे अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्या पलीकडील आहेत. रक्त-लघवी चाचणी करून हाडाचे विकार शोधणारी प्रणाली विकसित आहे, पण त्यात नेमके कोणते घटक शोधावेत व त्याचे विवेचन कसे करावे यांवर संशोधन चालू आहे. पण, या सगळ्या विषयांची एकत्रित माहिती, साध्या भाषेत, उपलब्द होत नाही व सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नाही.  नुकतेच, डॉ. अमृता नाईक यांनी या विषयांचे "बायोमटेरियल्स ऍडव्हान्ससेस" या आंतरराष्ट्रीय नियतकालीकेत (एल्सवियर प्रकाश...

आंब्याचे झाड!

  आंब्याचे झाड! - डॉ. मुकुल स. गोडबोले कोईतून जन्म घ्यावे, धरणीमातेचा हातभार, वृक्ष असावे आंब्याचे, कल्पतरू, सर्वांना आधार! पाना-फांद्यांचा पसारा, देई सावली व थंड वारा, वाटसरू वा गाय-वासरू, विसावी छायेत आईच्या! सणा-सुदीला तोरण, हिरवी आंब्याची पानं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, पानांचा डौल सदाबहार! वर्षभर चाले कारभार, वसंत ऋतूत येई बहार, मोहोर, कैरी, आंबा, उल्हासित होई उन्हाळा! आंबट, पण उत्साहवर्धक, कैरी ची मजाच न्यारी, लोणचे, पन्हे, साखरंबा, बरणीत वर्षभर टिकवा! फळ आंब्याची थोरवी पहा, अल्लड युवराज होई राजा, केसरी, सुवासीन, चवदार, बागायतदारांना काळजी फार! सीझनचा पहिला आंबा, किंवा दर उतरेस तोवर थांबा, आमरस, चिरून, वा आइस्क्रीम खा, आंबा नं आवडे? डोके तपासा! हापूस, पायरी, तोतापुरी, ३०० हून अधिक जाती, आंबा कोकणचा वा मलीहाबाद, महती पोचली अटकेपार! कलम करून एकाच झाडावर, कैक जातीचे आंबे उगवा, एक असो वा अनेक, फळाच्या चवीत गोडवा! कलमी आंबा दुसर्‍या जातीचा, तरी झाड ना करे हाल-अपेष्टा, स्वतःचे कायदे नियम ना लादी, आंबा राखी मूळ गुण व जाती! पोटची कोय अर्पूनी, फेडतो मातीचे देणे, धडे घ्यावे माणसाने, कि...